
वंशावळ म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास वंशावळ म्हणजे आपल्या पूर्वजांचा इतिहास. वंशावळ म्हणजे आपल्या आजोबा, पणजोबा व त्यांचे आई वडील यांची नावे व माहिती.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती चे नाव व माहिती ही वंशावळीत असते.
आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती वंशावळीत नमूद केलेली असते.
वंशावळ म्हणजे काय?
आपल्या पिढीच्या पहिल्या व्यक्तीपासून तर आता अस्तित्वात असलेल्या व्यक्तीपर्यंतच्या प्रत्येक व्यक्तीचं नाव क्रमवार उतरत्या स्वरूपात लिहिलेल्या कागदपत्राला वंशावळ म्हणतात.
सोप्या भाषेत सांगायच झालं तर आपल्या पूर्वज्यांची नावे व त्याचा इतिहास आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे.
आपल्या पिढीत आपण ही नावं खापर पणजोबा किंवा आजोबापासून लिहू शकतो.यालाच इंग्रजीत फॅमिली ट्री असं म्हणतात.
वंशावळ कशी काढतात ?
वंशावळ काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील आधीच्या पिढीतल्या व्यक्तींची नाव तुम्हाला माहिती पाहिजेत. त्यांची उतरत्या क्रमानं लिहावी लागतात.आधी खापर पणजोबा, मग पणजोबा, त्यानंतर आजोबा, आजोबाची मुलं, आजोबांच्या मुलांची मुलं अशी नावं उतरत्या क्रमानं लिहावी लागतात.
ज्या व्यक्तीचा जातीचा दाखला काढायचा आहे, त्याच्या नावापर्यंत ही वंशावळ लिहावी लागते.निजामकालीन नोंदी शोधण्याचं काम महसूल विभाग करत आहे.
निजामकालीन नोंदी शोधण्याचं काम महसूल विभाग करत आहे. समजा मला कुणबी प्रमाणपत्र काढायचं आहे, तर मी शोध घेणार की, माझ्या पणजोबाच्या नावासमोर कुणबी आहे.
याचा रेकॉर्ड तहसील कार्यालयात जुने हक्क नोंदण्यांमध्ये आढळतो. कोतवाल बुकामध्ये जन्म-मृत्यूची नोंदवही असते. तिथं कुटुंबाच्या पूर्वजाचा इतिहास मिळतो. जर आपल्याला आपल्या पूर्वज्यांचा इतिहास माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कोतवाल बुक मध्ये शोधू शकता.
याशिवाय, जुन्या शैक्षणिक नोंदींमध्येही पूर्वजांच्या जातीचा उल्लेख आढळतो. आजोबा शिकलेले असेल आणि त्यांनी जातीची नोंद केलेली असेल तर तिथंही नोंद आढळते.
वंशावळ कशासाठी लागते ?
आताच्या जन्म नोंदींसमोर नावासमोर जात लिहिली जात नाही. फक्त आडनाव लिहिलं जातं.पण कॉलेजमधील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी जातीचं प्रमाणपत्र काढावं लागतं.
त्यासाठी जुन्या रेकॉर्डचा आधार घ्यावा लागतो. कारण जुन्या रेकॉर्डमध्ये नावासमोर जातीचाच उललेख केलेला असायचा. याशिवाय, जात पडताळणीसाठीही वंशावळ लागते.
जात प्रमाण पत्र काढण्यासाठी वंशवळीची गरज असते, कारण त्यामध्ये आपण जून रेकॉर्ड तपासून आपली जात ओळखून प्रमाणपत्र काढू शकतो.
वंशावळ काढण्याची जबाबदारी कुणाची ?
वंशावळ स्वयंघोषित असते. म्हणजे अर्जदारानं स्वत:हून वंशावळ लिहायची असते.
वंशावळीसाठी कुठेही अर्ज वगैरे करायची गरज नसते.
एखाद्याची कुणबी नोंद सापडल्यास इतरांना फायदा ?
एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींपैकी कुणाचं कुणबी नोंद आढळल्यास त्याच्या पुढच्या पिढ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं.
याचा अर्थ एखाद्या भागात एकाची कुणबी नोंद सापडली म्हणजे त्या भागातल्या सगळ्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळेल असा होत नाही.
यासाठी प्रत्येकाला स्वतंत्रपणे कुटुंबाचा इतिहास तपासून त्यासंबंधीची कागदपत्रं सबमिट करावे लागतील Wanshawal Kashi Kadhavi.