
Beed Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी कारवाई चालू केली आहे. आरोपींकडून झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीपोटी 11 कोटींची
वसुली करणार आहेत.बीड : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनालाबीड
जिल्ह्यात (Beed) 30 ऑक्टोबर रोजी हिंसक वळण लागले. आमदार प्रकाश सोळुंके आणि संदीप क्षीरसागर यांचे घर पेटवून
देण्यात आले आहे. सोबतच माजलगाव नगरपरिषदेच्या (Majalgaon Nagarparishad) इमारतीलादेखील आग
लावण्यात आली. आंदोलनाला लागलेले हिंसक वळण आता आरोपींना महागात पडणार आहे अस दिसून येत आहे. सुमारे 11
कोटींची वसुली आरोपींकडून करणार आहे.बीड शहर आणि माजलगाव मध्ये झालेल्या हिंसाचारात सुमारे अकरा कोटी
रुपयांचे नुकसान झालेले आहे . या सर्व नुकसानीची वसुली या प्रकरणातील आरोपीकडून केली जाणार आणि तसा अहवाल
सुद्धा तयार होत आहे. आरोपींनी ही भरपाई दिली नाही तर त्यांच्या वैयक्तिक मालमत्ता जप्त करून वसुली होईल अशी
माहिती बीडचे जिल्हा (Beed Police) पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिलेली आहे.बीडमध्ये हिंसाचार आणि
जाळपोळ करणाऱ्या 144 आरोपींना अटक तर दोन हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे. तर,
पोलिसांकडून अन्य आरोपींचा शोध सुद्धा चालू आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून बीडमध्ये दगडफेक आणि जाळपोळ
करणाऱ्या 144 आरोपींना बीड पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. तर, 500 हून जास्त जणांची चौकशी या प्रकरणात
पोलिसांनी केलेली आहे. तर दोन हजार जणांवर या प्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती बीडचे पोलीस
अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिलेली आहे. जमावाने फोडलेल्या 61 बसेसच्या काचा बसवण्याचे काम सुरु झालेले
आहे मराठा आरक्षणासाठी (Beed Maratha Reservation) चालू असलेल्या आंदोलनाला बीड जिल्ह्यात हिसंक वळण लागल्याने
मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि जाळपोळ झाल्याचे दिसून येत आले होते. याचवेळी बीड शहरातील बस स्थानकावर उभ्या
असलेल्या अनेक बसेसची सुद्धा तोडफोड करण्यात आली होती. त्यामुळे, बीडमध्ये जमावाने फोडलेल्या 61 बसेसच्या काचा
बसवण्याचं काम सुद्धा पातळीवर चालू करण्यात आले आहे. यासाठी वीस लाखांच्या काचा हिमाचल प्रदेशमधून मागवण्यात
आलेल्या आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्व बसेचीच मागणी पाहता तत्काळ दुरुस्तीचे कामे हाती घेण्यात आली आहे.
बीडमधील जाळपोळ पूर्वनियोजित?
बीडमधल्या अनेक ठिकाणी शासकीय कार्यालयं, राजकीय पक्षांची कार्यालय सुद्धा
आंदोलकांच्या तावडीतून सुटली नाहीत. त्यामुळे जाळपोळ पूर्वनियोजित कट असल्याची शक्यता आहे. कारण जाळपोळ
करणारे बीड परिसरासोबत तालुक्याच्या बाहेरचे असल्याची माहिती समोर आली आहे.
सिंगल चार्जमध्ये 100 किमी रेंज असलेली इलेक्ट्रिक सायकल फक्त 999 रुपयांमध्ये घरी आणा